संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी नेमणूक करण्यासाठी अश्विनी कदम यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

सहकार नगर, ता. २५ : – पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पुणे शहरांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे काम चालू आहे. परंतु गेली सहा महिन्यांपासून पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट व कोथरूड या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये या कामासाठी तलाठी उपलब्ध नाहीत. अशी तक्रार अश्विनी कदम यांनी केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण दाखल केल्यानंतर तलाठी घरी पडताळणीसाठी येत असतात. पडताळणी झाल्यावरच अहवाल सादर केला जातो व त्यावर पुढील कार्यवाही होते. परंतु मागील सहा महिन्यांपासून या कामासाठी तलाठ्यांची नेमणुका केलेल्या नाहीत. अनेक नागरिकांची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाहीये. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ठिकाणी तलाठ्यांची नेमणूक त्वरित करावी. अशी विनंती केली आहे. असे माहिती देताना कदम म्हणाल्या.